मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अरे परसाद फोन आया है..............

 मागच्या भागात मी म्हणालो, हो तो काळ मोबाईल फोनचा नक्कीच नव्हता. बीएसएनएल चे तरंग नावाचे ओबडधोबड हँडसेट आले होते. त्यावरून कॉल करणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोघांनाही खर्च व्हायचा. म्हणजे पैसे कट व्हायचे. ग्रामीण भागात बीएसएनएल चेच लँडलाईन किंवा हे तरंग हा आधार होता. शहरी भागात स्पाईस कंपनीचे हँडसेट आले होते. रिलायन्स चा दुनिया मुठ्ठीमे म्हणणारा जमाना या क्षेत्रात अजून यायचा होता. आमच्या मामांकडे मोबाईल नव्हता आणि आमच्या घरी तर फोन असण्याचा संबंध अजिबात नव्हता. गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या अबुल भैय्या( म्हणजे तुर्केवाडीचे अबुल शेख. ते सध्या मोठे व्यापारी आहेत)यांच्या दुकानातील फोन हाच आमचा आधार. अबुल भैय्या कायम बाहेर आणि भाभी कायम दुकानात. त्यांच्या दुकानातील साहित्य उधारी घेऊन आम्ही जमेल तेंव्हा पैसे द्यायचो. कधी कुणाला फोन करायचा झाला तरी तीही उधारी सामानाच्या उधारी यादीत समाविष्ट व्हायची. रात्री अपरात्री कधीही फोन आला तरी हाक मारायला हे भैय्या भाभी कधीच त्रास वाटून घ्यायचे नाहीत. त्यादिवशीही तसेच झाले. 2004 चा जानेवारी महिना होता आणि तारीख होती 15. अचानक भाभीचा आवाज आला. अरे परसाद ...

ते दिवस.....

पत्रकारितेत दाखल झालो तो काळ थोडा बिकट होता. 2004 सालची गोष्ट आहे. आजपासून बरोबर सतरा वर्षांपूर्वी. त्यावेळी मी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन शाखेतून डिप्लोमा करायचो. आम्ही तसे मूळचे बेळगावच्या टिळकवाडीचेच पण आमचे कुटुंब जवळच्याच चंदगड तालुक्यातील तुर्केवाडीला शिफ्ट झाले आणि आम्ही तुर्केवाडीकर झालो. (तो सगळा इतिहास नंतर कधी तरी लेखनात नक्की येईल.) माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तुर्केवाडीलाच झाले. त्यानंतर डिप्लोमासाठी मी बेळगावला येऊ लागलो. आमच्या जनता विद्यालयात दहावीला वर्गात पहिला क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेला मी त्यावेळचा गाव लेव्हलला हुशार विद्यार्थी. हुशारी नेमकी काय असते ते बेळगावच्या आर एन शेट्टी पॉलिटेक्निकला आल्यावर चांगलीच कळली. इंग्रजी बोलता येत नव्हते. कन्नडचा तर गंधच नव्हता आणि डिप्लोमाचा अभ्यासक्रम डोक्यावरून जात होता. कॅपॅसीटर, डायोड, सेमीकंडक्टर सारख्या वस्तू आणि बाकीचे शब्द,प्रॅक्टिकल्स आणि थेअरी सगळेच बाऊन्सर मारत होते. मी हुशार होतो मराठी लेखनात, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धात पण मार्गच बदलला होता. एरव्ही रट्टा मारून वीस वीस मिनिटे भाषणे झोडून स्पर्धा गाजवणारा मी, ...

का लिहितोय?

 नमस्कार मंडळी, मी प्रसाद सु प्रभू. आपण मला ओळखताच, पण तरीही ज्यांना माझा परिचय नाही त्यांना तो करून द्यायलाच हवा. मी एक पत्रकार. सध्या सोशल मीडियावर काम करतोय. खरंतर पत्रकार होईन असं कधी वाटलं नव्हतं आणि ठरवलंही नव्हतं, पण काही प्रसंग घडले आणि मी या क्षेत्रात आलो. सुरुवातीला प्रिंट मीडियात काम करताना कधी वाटलंही नव्हतं की माझी अशी वेगळी ओळख निर्माण होईल म्हणून. पण शेवटी झालंच. नाव चमकू लागलं. अनेक घटना आणि प्रसंगात फक्त बातमी पुरते मर्यादित न राहता, बातमीच्या आत शिरण्याचा प्रयत्न करायचा असतो हे ही अनुभवातून कळत गेलं आणि मी नावाजला गेलो. कौतुक झालं, पुरस्कार मिळाले आणि कामाच्या अनेक संधीही आल्या. अनेक वर्षे मुद्रित माध्यमातून काम करणारा मी दृकश्राव्य प्रकारच्या क्षेत्रात सोशल मीडियावर चमकू लागलो. पूर्वी पेपरला बातमीवर बायलाईन यावी अर्थात आपलं नाव यावं अशी एक इच्छा असायची. कधीतरी उपसंपादकांनी नाव काढलं की तडफड व्हायची, पण आत्ता तर मी थेट दर्शकांसमोर जाऊन त्यांच्याशी कधी एडिटेड व्हिडीओ मधून तर कधी थेट live हितगुज करू लागलो. आमचा काळ आधुनिक पत्रकारितेवर स्वार होणारा यामुळे माहिती मिळव...