मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मजा किर्लोस्कर रोडची

  हा फोटो आहे सूर्योदयाचा. उद्देश एकच हा जो ब्लॉग मी लिहितोय तो प्रसाद सु प्रभू या नावाच्या व्यक्तीच्या स्वतंत्रपणे काही करून दाखविण्याच्या उदयाला सुरुवात झाली तेंव्हाचा.म्हणूनच सूर्योदयाचा फोटो घालून सुरुवात करतोय.  बेळगावच्या प्रकाश लॉजिंग मध्ये मॅनेजर म्हणून काम करण्याचा शुभारंभ झाला. किर्लोस्कर रोड वरील हा लॉज म्हणजे गोमंतकीय नागरिकांचे बेळगावातील हक्काचे घर. गोव्याचे लोक खरेदीसाठी दर आठवड्याला बेळगावला यायचे. आत्ताही येतात पण रस्ते सुसाट झाल्यापासून त्यांचे वास्तव्य कमी झाले. पूर्वी ते यायचे. बेळगावच्या मध्यवर्ती बाजारपेठेत मनसोक्त विहरायचे. खरेदी करायचे आणि वास्तव्याला एक तर हॉटेल अनुपम किंवा प्रकाश लॉजलाच जास्त पसंत करायचे. यामुळे सतत कोकणी बोलणाऱ्या आणि नेहमी चांगली मच्छि कुठे मिळता रे असे विचारणाऱ्या आवाजांची सवय करून घ्यावी लागली. इथला दिवस लवकर सुरू व्हायचा. सकाळी सहा वाजता उठावे लागायचे. रूम बॉईज सकाळी सकाळी बम्ब पेटवायचे. कस्टमरला लवकरात लवकर गरम पाणी मिळावे आणि कुणाचीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जायची. लगेचच साफसफाई सुरू व्हायची. लॉजला आलेली माणसे रात्री उश...
अलीकडील पोस्ट

मीच काम सोडलं

मागच्या ब्लॉग मध्ये माझा प्रवास बेळगावच्या प्रसिद्ध प्रकाश लॉज च्या मॅनेजर पर्यंत झाला होता. मी लॉज मॅनेजर म्हणून कसं काम केलं आणि पुढे तरुण भारत पर्यंत कसा पोहोचलो हा सारा प्रवास पुढील ब्लॉग पासून सांगणार आहेच. मध्ये बराच वेळ गेला आणि ब्लॉग लिहायचं राहून गेलं. आणि मधला सर्व इतिहास पेंडिंग ठेऊन वर्तमानकालीन घडामोड सांगण्याची वेळ आली. माझ्या कारकिर्दीत सध्या आलेला एक टर्निंग पॉईंट आधी सांगून मग मागील प्रवासकडे वळण्याचा निर्णय मी घेतला आहे. आपण वेळ काढून वाचाल हीच अपेक्षा आहे. नमस्कार, मी प्रसाद सु. प्रभू. 2004 पासून तरुण भारत या दैनिकात कार्यरत होतो. विद्यार्थी वार्ताहर, वार्ताहर ते विविध भूमिका निभावत निभावत सध्या सोशल मीडिया टीम प्रमुख आणि यु ट्यूब चॅनेल चा डिजिटल एडिटर. होय होतो, आता नाही. मी माझ्या पदाचा आणि सेवेचा राजीनामा दिला आणि त्याला आज एक महिना पूर्ण झाला. नोटीस पिरियड संपला आणि आता मी मुक्तपणे पत्रकारिता तसेच इतर अनेक भूमिकांमधून तुमच्या सगळ्यांच्याच भेटीला येत राहणार आहे. राजीनामा दिला तर का दिला? खरंच सोडलं की काढलं? असे अनेक प्रश्न विचारणारे फोन आले म्हणून सांगतोय, माझी स...

आणि मी लॉज मॅनेजर झालो........

धाकधूक वाढत गेली

 बातम्या वाचणे हा प्रकार माहीत होता पण सलग असे रोज पेपर वाचणे लहानपणी कधी जमले नाही. घरी पेपर घेणं परवडत नव्हतं आणि रविवारी घेतलेला तरुण भारत मुख्य पेपर वाचण्यापेक्षा अक्षरयात्रा पुरवणी वाचण्याबद्दल फार भर होता. सुंदर सुंदर कव्हर स्टोरी आणि आणि ललित लेख वाचायला फार आवडायचे. त्यावेळी अक्षरयात्रेत काही कादंबरी क्र म श स्वरूपात यायच्या,त्या वाचायला मजा यायची. अभ्यासाच्या गोंधळात विशेष वाचन व्हायचं नाही आणि जे काही वेगळं वाचन व्हायचं ते या पुरवणीमुळे त्यामुळे प्रतीक्षा लागून राहिलेली असायची. तसाच बुधवारचा खजाना आणि शुक्रवारी फिल्मी दुनियेवर आधारित पुरवणी हाती पडली की मनसोक्त वाचायची सवय जडली होती. यामुळे बातमी वाचण्याकडचा कल कमी होता. आठवी नववीत गेल्यावर आमच्या जनता विद्यालय हायस्कुलचे मुख्याध्यापक एस एम पाटील सरांनी वर्तमानपत्रात येणारे अग्रलेख वाचण्याचा सल्ला दिला होता. आसपास काय घडतं यावर केलेलं विस्तृत आणि अभ्यासपूर्ण लेखन असतं ते, त्यामुळे वाचा अशी सूचना त्यांनी एकदा वर्गात केली होती. त्यामुळे कधी कधी आणि शक्यतो कमीच अग्रलेख वाचले गेले होते. हे सांगायचा मुद्दा हा की मी बसमध्ये बसू...

शोधायला पण लागते अक्कल

 मी काही प्रसिद्ध लेखक नाही. मात्र तरुण भारत च्या कृपेने नक्कीच प्रसिद्ध बातमीदार आहे. एक शैली विकसित करण्यासाठी अनेक वर्षे जावी लागली. पण जी शैली लेखनाच्या बाबतीत आली त्या शैलीचे अर्थात माझ्या लेखनाचे कौतुकही झाले. कामाच्या बाबतीत अनेक ज्येष्ठ व्यक्तींकडून हा अनुभव आला आहेच. आता ब्लॉगचे लिखाण सुरू झाल्यावर तर याचा अनुभव अधिक प्रमाणात येतोय. माझ्या सख्या सहकाऱ्यांनी कौतुक केले, एक वेबसिरीजचा निर्माता फोन करून स्तुती करून राहिला आणि इतर सर्वांनी तर अरे बाबा लवकर लवकर लिही असे सांगून ऊर्जा वाढविली.  केवळ दोन तीन ब्लॉग लिखाणातच मिळालेली दाद ऐकून नेहमीप्रमाणे माझी छाती रुंदावली आहे. मी माझ्या एक खास वाचकाशी काल बोलत होतो. त्या वाचकाने माझ्या मागच्या ब्लॉग वरून म्हटले की प्रसाद अरे तू अजून तुर्केवाडी फाट्यापर्यंत पोहोचला नाहीस. मी म्हटलं जिथे मी सतरा वर्षे नोकरी केली ते तरुण भारत चं कार्यालय मला माहित नव्हतं, मी चालत होतो आणि विचारात होतो.वाचकाने सांगितलं आता पुढचं लिही आणि तो वाचक खास असल्याने म्हणालो अशी उत्सुकता ताणवायला मला आवडतं. मग आम्ही आमच्या व्हाट्सअप्प चॅट वर इमोजी वापरून...

अरे परसाद फोन आया है..............

 मागच्या भागात मी म्हणालो, हो तो काळ मोबाईल फोनचा नक्कीच नव्हता. बीएसएनएल चे तरंग नावाचे ओबडधोबड हँडसेट आले होते. त्यावरून कॉल करणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोघांनाही खर्च व्हायचा. म्हणजे पैसे कट व्हायचे. ग्रामीण भागात बीएसएनएल चेच लँडलाईन किंवा हे तरंग हा आधार होता. शहरी भागात स्पाईस कंपनीचे हँडसेट आले होते. रिलायन्स चा दुनिया मुठ्ठीमे म्हणणारा जमाना या क्षेत्रात अजून यायचा होता. आमच्या मामांकडे मोबाईल नव्हता आणि आमच्या घरी तर फोन असण्याचा संबंध अजिबात नव्हता. गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या अबुल भैय्या( म्हणजे तुर्केवाडीचे अबुल शेख. ते सध्या मोठे व्यापारी आहेत)यांच्या दुकानातील फोन हाच आमचा आधार. अबुल भैय्या कायम बाहेर आणि भाभी कायम दुकानात. त्यांच्या दुकानातील साहित्य उधारी घेऊन आम्ही जमेल तेंव्हा पैसे द्यायचो. कधी कुणाला फोन करायचा झाला तरी तीही उधारी सामानाच्या उधारी यादीत समाविष्ट व्हायची. रात्री अपरात्री कधीही फोन आला तरी हाक मारायला हे भैय्या भाभी कधीच त्रास वाटून घ्यायचे नाहीत. त्यादिवशीही तसेच झाले. 2004 चा जानेवारी महिना होता आणि तारीख होती 15. अचानक भाभीचा आवाज आला. अरे परसाद ...

ते दिवस.....

पत्रकारितेत दाखल झालो तो काळ थोडा बिकट होता. 2004 सालची गोष्ट आहे. आजपासून बरोबर सतरा वर्षांपूर्वी. त्यावेळी मी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन शाखेतून डिप्लोमा करायचो. आम्ही तसे मूळचे बेळगावच्या टिळकवाडीचेच पण आमचे कुटुंब जवळच्याच चंदगड तालुक्यातील तुर्केवाडीला शिफ्ट झाले आणि आम्ही तुर्केवाडीकर झालो. (तो सगळा इतिहास नंतर कधी तरी लेखनात नक्की येईल.) माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तुर्केवाडीलाच झाले. त्यानंतर डिप्लोमासाठी मी बेळगावला येऊ लागलो. आमच्या जनता विद्यालयात दहावीला वर्गात पहिला क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेला मी त्यावेळचा गाव लेव्हलला हुशार विद्यार्थी. हुशारी नेमकी काय असते ते बेळगावच्या आर एन शेट्टी पॉलिटेक्निकला आल्यावर चांगलीच कळली. इंग्रजी बोलता येत नव्हते. कन्नडचा तर गंधच नव्हता आणि डिप्लोमाचा अभ्यासक्रम डोक्यावरून जात होता. कॅपॅसीटर, डायोड, सेमीकंडक्टर सारख्या वस्तू आणि बाकीचे शब्द,प्रॅक्टिकल्स आणि थेअरी सगळेच बाऊन्सर मारत होते. मी हुशार होतो मराठी लेखनात, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धात पण मार्गच बदलला होता. एरव्ही रट्टा मारून वीस वीस मिनिटे भाषणे झोडून स्पर्धा गाजवणारा मी, ...