मुख्य सामग्रीवर वगळा

अरे परसाद फोन आया है..............

 मागच्या भागात मी म्हणालो, हो तो काळ मोबाईल फोनचा नक्कीच नव्हता. बीएसएनएल चे तरंग नावाचे ओबडधोबड हँडसेट आले होते. त्यावरून कॉल करणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोघांनाही खर्च व्हायचा. म्हणजे पैसे कट व्हायचे. ग्रामीण भागात बीएसएनएल चेच लँडलाईन किंवा हे तरंग हा आधार होता. शहरी भागात स्पाईस कंपनीचे हँडसेट आले होते. रिलायन्स चा दुनिया मुठ्ठीमे म्हणणारा जमाना या क्षेत्रात अजून यायचा होता. आमच्या मामांकडे मोबाईल नव्हता आणि आमच्या घरी तर फोन असण्याचा संबंध अजिबात नव्हता. गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या अबुल भैय्या( म्हणजे तुर्केवाडीचे अबुल शेख. ते सध्या मोठे व्यापारी आहेत)यांच्या दुकानातील फोन हाच आमचा आधार. अबुल भैय्या कायम बाहेर आणि भाभी कायम दुकानात. त्यांच्या दुकानातील साहित्य उधारी घेऊन आम्ही जमेल तेंव्हा पैसे द्यायचो. कधी कुणाला फोन करायचा झाला तरी तीही उधारी सामानाच्या उधारी यादीत समाविष्ट व्हायची. रात्री अपरात्री कधीही फोन आला तरी हाक मारायला हे भैय्या भाभी कधीच त्रास वाटून घ्यायचे नाहीत.

त्यादिवशीही तसेच झाले. 2004 चा जानेवारी महिना होता आणि तारीख होती 15. अचानक भाभीचा आवाज आला. अरे परसाद जलदी आव, फोन आया तुम्हारा. कॉलेज नव्हते,मी घरीच होतो. लगेच दुकानाकडे पळालो. फोन कुणाचा असेल बरं? विचार सुरूच होता. पलीकडून मामा बोलत होते. त्यांनी त्या तरुण भारत च्या जाहिरातीची माहिती दिली. महत्वाचे म्हणजे ती जाहिरात तरुण भारतच्या बेळगाव आवृत्तीला आहे आणि अर्ज करायची तारिख त्याच दिवशीची म्हणजे 15 जानेवारी आहे. आणखी महत्वाचे म्हणजे त्यादिवशी सायंकाळी 5 पर्यंतच अर्ज करता येणार आहेत. लवकर कायतरी कर आणि बसने बेळगावला येऊन आजच्या आज पाचच्या पूर्वी तरुण भारत कार्यालयात जाऊन अर्ज दे. मी ऐकतानाच हे सगळं कसं शक्य आहे? हा विचार करीत होतो.मामांनी परत एकदा कॉइन टाकल्याचा आवाज आला. होय ऐकलं सगळं. मी म्हणालो. आणि हे बघ पेपर कदाचित बँकेत मिळेल. तिथंच बेळगाव आवृत्ती घेतात. हो हो मी जाऊन येतो असे म्हणत मी दुकानातल्या घड्याळाकडे बघितलं. दुपारचे बारा वाजले होते. ठीक आहे ठेवतो फोन असं म्हणून मी फोन ठेवला, आणि आता काय काय करायचं, कसं कसं करायचं याचं नियोजन करत दुकानाच्या कट्ट्यावर विचारात गुंतून गेलो. तो काळ प्रायव्हसी वगैरेचा नव्हता. जीवाला जीव देण्याचा होता. इतकावेळ माझं फोनवर चाललेलं संभाषण भाभी ऐकत होत्या. त्यानंतर गोंधळात पडलेल्या मला त्यांनी हलवलेच. परसाद क्या हुवा? कोनसे खयालोमी अटक्या? त्यांनी विचारले. मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली आणि पुन्हा विचारात गढून गेलो.

आमची आई म्हणजेच आई आणी मामांची आई घरी होती. माझी आई म्हणजेच मम्मी अंगणवाडी शिक्षिका होती.नुकतीच तिची अंगणवाडी पर्यवेक्षिका पदी बढती झाल्याने ती चंदगडला ऑफिसला गेली होती.पैसे नव्हते शिवाय पेपर मिळवून जाहिरात वाचून त्यानंतर अर्ज तयार करून सायंकाळी पाचच्या आत बेळगावला तरुण भारत कार्यालयात जाऊन अर्ज सादर करायचा हे दिव्य होते. विचार करूनच मला घाम आला. मी भाभी ना थोडक्यात सगळं सांगितलं. त्यांनी चटकन गल्ला उघडला. 100 रुपयांची नोट काढून हातात दिली. नोकरिका सवाल है ना? जादा सोचते बैठनेका नही।चल काम को लग तू। जाकू आ। चल भाग अभी।

मला भलताच धीर आला. घरी येऊन मी आईला माहिती दिली. तिनेही लगेच होकार दिला. लगेच चांगले कपडे घालून बाहेर पडलो. थेट महाराष्ट्र बँकेत गेलो. बँकेत सगळे कर्मचारी बेळगावहून कामाला यायचे,शिवाय आमचा भाग महाराष्ट्रात असला तरी जास्त संबंध महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात अडकलेल्या बेळगावशीच असायचा. त्यामुळे तिथे बेळगावचा तरुण भारत घेतला जायचा. मी हळूच आत गेलो. सगळे कामात बिझी होते.आमच्या गावचेच दत्ता दादा तिथे कामाला होते,आजही आहेत. त्यांना हळूच बाजूला बोलावून मला पेपर पाहिजे आणि किती महत्वाचे आहे याची कल्पना दिली. त्यांनी इतरांना डिस्टर्ब न करता की कळू न देता पेपर माझ्या समोर आणून दिला. मी तो उघडला. ती जाहिरात दिसली. हायसे वाटले. मी पूर्ण पेपर न घेता फक्त हवे तेवढेच पान घेतले. मॅनेजर साहेबांना सांगायला पाहिजे का? मी हळूच विचारले. नको आत्ता कामात आहेत. मी सांगतो नंतर दत्ता दादा म्हणाले. चल तू जा, कामाला लाग. आणि हो बेस्ट ऑफ लक....दत्ता दादांनी शुभेच्छाच देऊन टाकली. परत मोर्चा घरी वळविला.

घरी आलो. पांढरे कागद घेऊन लहानसा एक अर्ज तयार केला. आणि कॉलेजच्या बॅगेत तो अर्ज घातला. जोडीला यापूर्वी भाषण आणि निबंध स्पर्धांमध्ये मिळविलेली बक्षिसे आणि प्रमाणपत्रे घेतली. देवाच्या आणि आईच्या पाया पडून निघालो. आता बस पकडायला एक किलोमीटर चालून तुर्केवाडी फाट्यावर जायचे होते. बस पकडल्यावर किमान पाऊण तासांचा प्रवास करायचा होता. दरम्यान आणखी एक मोठी समस्या लक्षात आली. ज्या तरुण भारत कार्यालयात जाऊन सायंकाळी 5 पूर्वी भेटायचे होते ते कार्यालय नेमके कुठे आहे? हेच आपल्याला माहीत नाही? अरे बापरे कसे काय करायचे? तुर्केवाडी फाट्याकडे चालत चालत मी आता या नव्या विचारात गुंतलो गेलो होतो.

--------------------------------------------------------------------------

English version

As I  said in last episode, yes that time was definitely not of mobile.  BSNL had a rugged handset called Tarang.  It used to cost both the caller and the receiver.  That is, both had to pay.  In rural areas BSNL  landline or this tarang was the main support.  Spice was the only mobile company in the urban area.  The era of Reliance was yet to come.  My Mama didn’t have a mobile phone, and we didn’t have a phone at home.  The phone in the shop of Abul Bhaiya (Abul Sheikh of Turkewadi, who is now a big trader) on the corner of the street was our support.  Abul Bhaiya was always out and Bhabhi was always in the shop.  We borrowed material from their shop and paid when we could.  Money was added to the list of borrowed items whenever our family wanted to make a phone call.  The bhaiya and bhabhi did not want to be bothered to call even if the phone rang late at night.


 The same thing happened that day.  It was January 2004 and the date was 15. Suddenly Bhabhi's voice came.  Hey Prasad, come early, the call came.  There was no college, I was at home.  I immediately ran to the shop.  Whose phone is it?  The thought was on.  I picked up the phone.  Mama was talking on the other side.  He informed about the advertisement of Tarun bharat.  Importantly, this advertisement is for the Belgaum edition of Tarun Bharat and the last date of application is the same day, January 15. More importantly, applications can be submitted till 5 pm on that day.  Do something early and come to Belgaum by bus and go to Tarun Bharat office before 5 today and apply.  How is all this possible?  I was thinking .  I heard my Mama throwing the coin again.  Yes, I heard everything.  I said.  And look, this paper is probably available at the bank.  That's where the Belgaum edition is.  Saying yes yes I do something I looked at the clock in the shop.  It was twelve o'clock in the afternoon.  Okay, so I put the phone down, and now I'm lost in the thought of what to do, how to do it, on the shop floor.  
Bhabhi was listening to my phone conversation.  Then she moved me.  What happened to Prasad?  Lost in what thought  shee asked.  I told her the whole situation and started thinking again.


 Our grandmother was at home.  My mother was an Anganwadi teacher and recently she was promoted as Supervisor and moved to her office at chandgad.  There was no money in the pocket.  to get the paper, read it, then prepare the application and go to the office of Tarun Bharat in Belgaum within five in the evening and submit the application.  The thought made me break out in a sweat.  I told bhabhi everything briefly.  She quickly opened the money box.  She took out a Rs 100 note and handed it over.  It's a question of job, don't sit and think too much.  Go early  Get to work, she said


 I left.  When I got home, I told my grandmother.  She immediately nodded.  Then I immediately got dressed and went out.  Went directly to Maharashtra Bank.  All the employees of the bank used to come from Belgaum for work, moreover, even though our part was in Maharashtra, the connection was more with Belgaum.  Therefore, the Tarun bharat of Belgaum was being taken there.  I went inside.  Everyone was busy at work.  Datta Dada from our village used to work there, he is still there today.  Informed him.  I wanted that paper and he got the idea  ​​how important it is.  He brought the paper in front of me without bothering anyone or letting others know.  I opened it.   saw the ad.  Felt high.  I took the leaves I wanted without taking the whole paper.  Should have to inform the manager?  I asked.  Not needed. He is  currently at work.  I will inform him later Datta Dada said.  Come on, get to work.  And yes good luck .... Datta Dada wished me well.  My front turned towards the house.


 Came home, took a white paper and made a small application. kept the application in  college bag.   Collected  won prizes and certificates which had previously won in speech and essay competitions.     Now I had to walk one kilometer to catch a bus to Turkewadi Phata.  We had to walk at least an hour to catch the bus.  Meanwhile another big problem was noticed.  Where exactly is the office of Tarun Bharat that I wanted to visit before 5 pm?  I did not know,  Oh god now how to found out that?   Walking towards the Turkewadi Phata, I was now engaged in this new thought.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शोधायला पण लागते अक्कल

 मी काही प्रसिद्ध लेखक नाही. मात्र तरुण भारत च्या कृपेने नक्कीच प्रसिद्ध बातमीदार आहे. एक शैली विकसित करण्यासाठी अनेक वर्षे जावी लागली. पण जी शैली लेखनाच्या बाबतीत आली त्या शैलीचे अर्थात माझ्या लेखनाचे कौतुकही झाले. कामाच्या बाबतीत अनेक ज्येष्ठ व्यक्तींकडून हा अनुभव आला आहेच. आता ब्लॉगचे लिखाण सुरू झाल्यावर तर याचा अनुभव अधिक प्रमाणात येतोय. माझ्या सख्या सहकाऱ्यांनी कौतुक केले, एक वेबसिरीजचा निर्माता फोन करून स्तुती करून राहिला आणि इतर सर्वांनी तर अरे बाबा लवकर लवकर लिही असे सांगून ऊर्जा वाढविली.  केवळ दोन तीन ब्लॉग लिखाणातच मिळालेली दाद ऐकून नेहमीप्रमाणे माझी छाती रुंदावली आहे. मी माझ्या एक खास वाचकाशी काल बोलत होतो. त्या वाचकाने माझ्या मागच्या ब्लॉग वरून म्हटले की प्रसाद अरे तू अजून तुर्केवाडी फाट्यापर्यंत पोहोचला नाहीस. मी म्हटलं जिथे मी सतरा वर्षे नोकरी केली ते तरुण भारत चं कार्यालय मला माहित नव्हतं, मी चालत होतो आणि विचारात होतो.वाचकाने सांगितलं आता पुढचं लिही आणि तो वाचक खास असल्याने म्हणालो अशी उत्सुकता ताणवायला मला आवडतं. मग आम्ही आमच्या व्हाट्सअप्प चॅट वर इमोजी वापरून...

धाकधूक वाढत गेली

 बातम्या वाचणे हा प्रकार माहीत होता पण सलग असे रोज पेपर वाचणे लहानपणी कधी जमले नाही. घरी पेपर घेणं परवडत नव्हतं आणि रविवारी घेतलेला तरुण भारत मुख्य पेपर वाचण्यापेक्षा अक्षरयात्रा पुरवणी वाचण्याबद्दल फार भर होता. सुंदर सुंदर कव्हर स्टोरी आणि आणि ललित लेख वाचायला फार आवडायचे. त्यावेळी अक्षरयात्रेत काही कादंबरी क्र म श स्वरूपात यायच्या,त्या वाचायला मजा यायची. अभ्यासाच्या गोंधळात विशेष वाचन व्हायचं नाही आणि जे काही वेगळं वाचन व्हायचं ते या पुरवणीमुळे त्यामुळे प्रतीक्षा लागून राहिलेली असायची. तसाच बुधवारचा खजाना आणि शुक्रवारी फिल्मी दुनियेवर आधारित पुरवणी हाती पडली की मनसोक्त वाचायची सवय जडली होती. यामुळे बातमी वाचण्याकडचा कल कमी होता. आठवी नववीत गेल्यावर आमच्या जनता विद्यालय हायस्कुलचे मुख्याध्यापक एस एम पाटील सरांनी वर्तमानपत्रात येणारे अग्रलेख वाचण्याचा सल्ला दिला होता. आसपास काय घडतं यावर केलेलं विस्तृत आणि अभ्यासपूर्ण लेखन असतं ते, त्यामुळे वाचा अशी सूचना त्यांनी एकदा वर्गात केली होती. त्यामुळे कधी कधी आणि शक्यतो कमीच अग्रलेख वाचले गेले होते. हे सांगायचा मुद्दा हा की मी बसमध्ये बसू...