मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मीच काम सोडलं

मागच्या ब्लॉग मध्ये माझा प्रवास बेळगावच्या प्रसिद्ध प्रकाश लॉज च्या मॅनेजर पर्यंत झाला होता. मी लॉज मॅनेजर म्हणून कसं काम केलं आणि पुढे तरुण भारत पर्यंत कसा पोहोचलो हा सारा प्रवास पुढील ब्लॉग पासून सांगणार आहेच. मध्ये बराच वेळ गेला आणि ब्लॉग लिहायचं राहून गेलं. आणि मधला सर्व इतिहास पेंडिंग ठेऊन वर्तमानकालीन घडामोड सांगण्याची वेळ आली. माझ्या कारकिर्दीत सध्या आलेला एक टर्निंग पॉईंट आधी सांगून मग मागील प्रवासकडे वळण्याचा निर्णय मी घेतला आहे. आपण वेळ काढून वाचाल हीच अपेक्षा आहे. नमस्कार, मी प्रसाद सु. प्रभू. 2004 पासून तरुण भारत या दैनिकात कार्यरत होतो. विद्यार्थी वार्ताहर, वार्ताहर ते विविध भूमिका निभावत निभावत सध्या सोशल मीडिया टीम प्रमुख आणि यु ट्यूब चॅनेल चा डिजिटल एडिटर. होय होतो, आता नाही. मी माझ्या पदाचा आणि सेवेचा राजीनामा दिला आणि त्याला आज एक महिना पूर्ण झाला. नोटीस पिरियड संपला आणि आता मी मुक्तपणे पत्रकारिता तसेच इतर अनेक भूमिकांमधून तुमच्या सगळ्यांच्याच भेटीला येत राहणार आहे. राजीनामा दिला तर का दिला? खरंच सोडलं की काढलं? असे अनेक प्रश्न विचारणारे फोन आले म्हणून सांगतोय, माझी स...

आणि मी लॉज मॅनेजर झालो........

धाकधूक वाढत गेली

 बातम्या वाचणे हा प्रकार माहीत होता पण सलग असे रोज पेपर वाचणे लहानपणी कधी जमले नाही. घरी पेपर घेणं परवडत नव्हतं आणि रविवारी घेतलेला तरुण भारत मुख्य पेपर वाचण्यापेक्षा अक्षरयात्रा पुरवणी वाचण्याबद्दल फार भर होता. सुंदर सुंदर कव्हर स्टोरी आणि आणि ललित लेख वाचायला फार आवडायचे. त्यावेळी अक्षरयात्रेत काही कादंबरी क्र म श स्वरूपात यायच्या,त्या वाचायला मजा यायची. अभ्यासाच्या गोंधळात विशेष वाचन व्हायचं नाही आणि जे काही वेगळं वाचन व्हायचं ते या पुरवणीमुळे त्यामुळे प्रतीक्षा लागून राहिलेली असायची. तसाच बुधवारचा खजाना आणि शुक्रवारी फिल्मी दुनियेवर आधारित पुरवणी हाती पडली की मनसोक्त वाचायची सवय जडली होती. यामुळे बातमी वाचण्याकडचा कल कमी होता. आठवी नववीत गेल्यावर आमच्या जनता विद्यालय हायस्कुलचे मुख्याध्यापक एस एम पाटील सरांनी वर्तमानपत्रात येणारे अग्रलेख वाचण्याचा सल्ला दिला होता. आसपास काय घडतं यावर केलेलं विस्तृत आणि अभ्यासपूर्ण लेखन असतं ते, त्यामुळे वाचा अशी सूचना त्यांनी एकदा वर्गात केली होती. त्यामुळे कधी कधी आणि शक्यतो कमीच अग्रलेख वाचले गेले होते. हे सांगायचा मुद्दा हा की मी बसमध्ये बसू...

शोधायला पण लागते अक्कल

 मी काही प्रसिद्ध लेखक नाही. मात्र तरुण भारत च्या कृपेने नक्कीच प्रसिद्ध बातमीदार आहे. एक शैली विकसित करण्यासाठी अनेक वर्षे जावी लागली. पण जी शैली लेखनाच्या बाबतीत आली त्या शैलीचे अर्थात माझ्या लेखनाचे कौतुकही झाले. कामाच्या बाबतीत अनेक ज्येष्ठ व्यक्तींकडून हा अनुभव आला आहेच. आता ब्लॉगचे लिखाण सुरू झाल्यावर तर याचा अनुभव अधिक प्रमाणात येतोय. माझ्या सख्या सहकाऱ्यांनी कौतुक केले, एक वेबसिरीजचा निर्माता फोन करून स्तुती करून राहिला आणि इतर सर्वांनी तर अरे बाबा लवकर लवकर लिही असे सांगून ऊर्जा वाढविली.  केवळ दोन तीन ब्लॉग लिखाणातच मिळालेली दाद ऐकून नेहमीप्रमाणे माझी छाती रुंदावली आहे. मी माझ्या एक खास वाचकाशी काल बोलत होतो. त्या वाचकाने माझ्या मागच्या ब्लॉग वरून म्हटले की प्रसाद अरे तू अजून तुर्केवाडी फाट्यापर्यंत पोहोचला नाहीस. मी म्हटलं जिथे मी सतरा वर्षे नोकरी केली ते तरुण भारत चं कार्यालय मला माहित नव्हतं, मी चालत होतो आणि विचारात होतो.वाचकाने सांगितलं आता पुढचं लिही आणि तो वाचक खास असल्याने म्हणालो अशी उत्सुकता ताणवायला मला आवडतं. मग आम्ही आमच्या व्हाट्सअप्प चॅट वर इमोजी वापरून...