मुख्य सामग्रीवर वगळा

आणि मी लॉज मॅनेजर झालो........

 मागच्या ब्लॉग नंतर थोडा उशीर झाला. का लिहितोय? या प्रश्नाची उत्तरे शोधत लिहीत राहणार असं मी जे सुरुवातीला सांगितलं....त्या प्रश्नांची उत्तरं आता सतरा वर्षांनंतर शोधताना अर्थात भूतकाळात शोधताना वर्तमानकाळातील काही घटना आणि घडामोडीत मी इतका अडकलो होतो की उशीर झालाच.


तर मी जाऊन अर्ज देऊन आलो होतो आणि प्रतीक्षेत होतो. आपल्याला बोलावणं येईल की नाही? आपण त्या विद्यार्थी वार्ताहर पदासाठी लायक ठरेन की नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मनात धाकधूक होती. आपण एखाद्या जबाबदारीत किंवा भूमिकेत शिरलो की काहीही करू शकतो अर्थात करून दाखवू शकतो पण ती जबाबदारी किंवा भूमिका मिळेपर्यंत आपली होणारी तगमग वेगळीच असते. ती शब्दात सांगता येत नाही. विशेषतः माणूस संधी मिळविण्यासाठी धडपडत असताना जी मानसिक स्थिती असते ती त्याच व्यक्तीला जास्त चांगली माहीत असते. आपण जे ठरवतो ते नेहमीच लवकर साध्य होईल असे नसते यामुळे थोडा आत्मविश्वास हवा असतो पण त्याकाळात तोच कमी पडत होता. काहीही करून नोकरीत शिरायचे हेच एकमेव ध्येय होते आणि त्यासाठी सरकारी नोकरी प्रमाणे कुठे शब्द टाकणे किंवा वशिला लावण्यासारखे काही करताही येत नव्हते. तसा एक विचार आला होता तरुण भारत मध्ये काम करणाऱ्या एकाद्या व्यक्तीला भेटून शब्द टाकण्याचा. नजरेसमोर तिघे होते. एक म्हणजे आमच्या गावाचाच एक भाग असलेल्या यशवंतनगरचे संतोष हेरवाडकर. त्यांची आणि माझी ओळख होती. ते तरुण भारतच्या वितरण विभागात कामाला होते. दुसरे त्याच गावचे संदीप सबनीस तेंव्हा ते कुठल्या विभागात हे माहीत नव्हते पण आता ते वितरण विभागात आहेत. या माणसांचा उल्लेख सुरुवातीला केला पण तिसरे नाव मी जे घेणार आहे ते वय,अनुभव आणि पदाने नक्कीच मोठे होते ते म्हणजे अनेक वर्षे शिक्षण क्षेत्र आणि पत्रकारिता गाजविलेले आणि निवृत्तीनंतर तरुण भारत मध्ये संपादकीय विभागात रुजू झालेले जयंत सबनीस सर. सबनीस सर आमच्याच गावचे अर्थात सबनीस . पण ते गडहिंग्लजला होते पूर्वी आणि नुकतेच काही वर्षांपूर्वी पुन्हा तुर्केवाडीला परतले होते. लांबून बोलणं बघणं व्हायचं पण त्यांच्याशी जास्त संपर्क कधी आला नव्हता. ताडमाड उंची आणि करारी चेहरा यामुळे त्यांच्याकडे जाऊन बोलायची भीतीच वाटायची. दुर्दैवाने ते फार लवकर गेले. एक आदरयुक्त भीती होती त्यांच्याबद्दल.आज त्यांचा पुतण्या अक्षय सबनीस सकाळ मध्ये कार्यरत आहे. त्यांचा पत्रकारितेचा वसा त्याने पुढे सुरू ठेवला आहे.

तर सांगायचा मुद्दा हा की मी अर्ज केलाय आणि जरा बघा असा शब्द या तिघांपैकी एकाकडे किंवा तिघांकडेही टाकावा का?याबद्दल विचार सुरू केला होता. पण तो विषय घरात चर्चेत असतानाच नोकरीची आणखी एक वाट चालून आली. मागच्या ब्लॉग मध्ये मी सांगितल्याप्रमाणे मी डिप्लोमा मध्ये नापास झालो होतो. रिपीटर म्हणून परीक्षा द्यायची होती. आणि तो अभ्यास करण्यापलीकडे माझ्याकडे दुसरे काहीच काम असे नव्हते. गिल्टीनेस म्हणजेच एक लाजिरवाणेपणा आला होता. त्यामुळेच नोकरीत अडकून चार पैसे तरी कमवावे असा माझा प्रयत्न सुरू झाला होता.इतक्यात आमच्या मावशी घरी आल्या होत्या. बेळगावच्या किर्लोस्कर रोडवर त्यांचे लॉजिंग होते. फेमस प्रकाश लॉज. त्यांचा मॅनेजर नुकताच सोडून गेला होता आणि त्यांना गरज होती विश्वासू मॅनेजर ची. मावशींनी सांगितलं की अभ्यास करायला मिळेल. शिफ्ट प्रमाणे काम करायचं आणि कामपण काय तितकं अवघड नाही. मग मी या तरुण भारत च्या अर्जाची माहिती दिली. तेंव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून विचार केला की जोपर्यंत तरुण भारत कडून काही कळत नाही तोवर आपण हा मार्ग स्वीकारावा. आणि मी दुसऱ्याच दिवशी बेळगावला येऊन लॉज मॅनेजर पदाची सूत्रे स्वीकारली. तरुण भारत मधून कॉल येईपर्यंत या अटीवर.

English version

It was a little late after the previous blog.  Why I am writing as  I entioned at the beginning that I will continue to search for the answers to this question .... Seventeen years later, while searching in past for the answers to these questions, I was so caught up in some events and happenings of the present that it was too late.

 As I said in my last blog, I went and applied and was waiting.  Can the company call me?  Would I qualify for the position of Student journalist?  Many such questions were raised.  There was a rush in my mind.  We can do anything if we take on a responsibility or a role, of course we can do it, but until we get that responsibility or role, our journey is different.  It cannot be expressed in words.  Especially when a person is struggling to get a chance, the same person knows the mental state better.  It is not always easy to achieve what we set out to do.  The only goal was to get into the job by doing anything, and there was no way to do anything like put a word or a word like a government job. 
 One such idea was to meet a person working in Tarun bharat and say a word.  There were three in sight.  One is Santosh Herwadkar from Yashwantnagar, a part of our village.  He and I knew each other.  He was working in the circulation department of Tarun bharat.  Sandeep Sabnis of the same village did not know in which department then but now he is in the distribution department.  These men were mentioned at the beginning but the third name I am going to take is definitely older in terms of age, experience and position.  Jayant Sabnis Sir ,Sabnis of our village.  But he had been to Gadhinglaj before and had just returned to Turkewadi a few years ago.  I wanted to talk with him but I never got in touch with him.  Because of his height and sharp face, I was afraid to go and talk to him.  Unfortunately he passed away too early.  There was a respectful fear about him. Today his nephew Akshay Sabnis is working in daily Sakal.  He has continued his uncles journalism career.

 So the point to make is that I have applied and the word 'look' should be applied to one or all of these three.  But while the subject was being discussed at home, another job came along.  As I mentioned in the previous blog, I failed the diploma.  I wanted to take the exam as a repeater.  And I had nothing else to do but study it.  Guiltness was a shame.  That's why I started trying to earn at least some money and engage myself by getting stuck in a job. Just then our aunt came home.  Her families lodging was there on Kirloskar Road in Belgaum.  Famous Prakash Lodge.  Their manager had just left and they needed a trusted person for the job.  My aunt told me , you can continue to study.  Working on a shift and work is not so difficult.  Then I informed her regardinv Tarun bharats application.  So we all decided that we should take this path unless we get call  from Tarun bharat.  And I came to Belgaum the next day and accepted the post of Lodge Manager.  On only one condition, will work till the call comes from Tarun Bharat.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शोधायला पण लागते अक्कल

 मी काही प्रसिद्ध लेखक नाही. मात्र तरुण भारत च्या कृपेने नक्कीच प्रसिद्ध बातमीदार आहे. एक शैली विकसित करण्यासाठी अनेक वर्षे जावी लागली. पण जी शैली लेखनाच्या बाबतीत आली त्या शैलीचे अर्थात माझ्या लेखनाचे कौतुकही झाले. कामाच्या बाबतीत अनेक ज्येष्ठ व्यक्तींकडून हा अनुभव आला आहेच. आता ब्लॉगचे लिखाण सुरू झाल्यावर तर याचा अनुभव अधिक प्रमाणात येतोय. माझ्या सख्या सहकाऱ्यांनी कौतुक केले, एक वेबसिरीजचा निर्माता फोन करून स्तुती करून राहिला आणि इतर सर्वांनी तर अरे बाबा लवकर लवकर लिही असे सांगून ऊर्जा वाढविली.  केवळ दोन तीन ब्लॉग लिखाणातच मिळालेली दाद ऐकून नेहमीप्रमाणे माझी छाती रुंदावली आहे. मी माझ्या एक खास वाचकाशी काल बोलत होतो. त्या वाचकाने माझ्या मागच्या ब्लॉग वरून म्हटले की प्रसाद अरे तू अजून तुर्केवाडी फाट्यापर्यंत पोहोचला नाहीस. मी म्हटलं जिथे मी सतरा वर्षे नोकरी केली ते तरुण भारत चं कार्यालय मला माहित नव्हतं, मी चालत होतो आणि विचारात होतो.वाचकाने सांगितलं आता पुढचं लिही आणि तो वाचक खास असल्याने म्हणालो अशी उत्सुकता ताणवायला मला आवडतं. मग आम्ही आमच्या व्हाट्सअप्प चॅट वर इमोजी वापरून...

धाकधूक वाढत गेली

 बातम्या वाचणे हा प्रकार माहीत होता पण सलग असे रोज पेपर वाचणे लहानपणी कधी जमले नाही. घरी पेपर घेणं परवडत नव्हतं आणि रविवारी घेतलेला तरुण भारत मुख्य पेपर वाचण्यापेक्षा अक्षरयात्रा पुरवणी वाचण्याबद्दल फार भर होता. सुंदर सुंदर कव्हर स्टोरी आणि आणि ललित लेख वाचायला फार आवडायचे. त्यावेळी अक्षरयात्रेत काही कादंबरी क्र म श स्वरूपात यायच्या,त्या वाचायला मजा यायची. अभ्यासाच्या गोंधळात विशेष वाचन व्हायचं नाही आणि जे काही वेगळं वाचन व्हायचं ते या पुरवणीमुळे त्यामुळे प्रतीक्षा लागून राहिलेली असायची. तसाच बुधवारचा खजाना आणि शुक्रवारी फिल्मी दुनियेवर आधारित पुरवणी हाती पडली की मनसोक्त वाचायची सवय जडली होती. यामुळे बातमी वाचण्याकडचा कल कमी होता. आठवी नववीत गेल्यावर आमच्या जनता विद्यालय हायस्कुलचे मुख्याध्यापक एस एम पाटील सरांनी वर्तमानपत्रात येणारे अग्रलेख वाचण्याचा सल्ला दिला होता. आसपास काय घडतं यावर केलेलं विस्तृत आणि अभ्यासपूर्ण लेखन असतं ते, त्यामुळे वाचा अशी सूचना त्यांनी एकदा वर्गात केली होती. त्यामुळे कधी कधी आणि शक्यतो कमीच अग्रलेख वाचले गेले होते. हे सांगायचा मुद्दा हा की मी बसमध्ये बसू...

अरे परसाद फोन आया है..............

 मागच्या भागात मी म्हणालो, हो तो काळ मोबाईल फोनचा नक्कीच नव्हता. बीएसएनएल चे तरंग नावाचे ओबडधोबड हँडसेट आले होते. त्यावरून कॉल करणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोघांनाही खर्च व्हायचा. म्हणजे पैसे कट व्हायचे. ग्रामीण भागात बीएसएनएल चेच लँडलाईन किंवा हे तरंग हा आधार होता. शहरी भागात स्पाईस कंपनीचे हँडसेट आले होते. रिलायन्स चा दुनिया मुठ्ठीमे म्हणणारा जमाना या क्षेत्रात अजून यायचा होता. आमच्या मामांकडे मोबाईल नव्हता आणि आमच्या घरी तर फोन असण्याचा संबंध अजिबात नव्हता. गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या अबुल भैय्या( म्हणजे तुर्केवाडीचे अबुल शेख. ते सध्या मोठे व्यापारी आहेत)यांच्या दुकानातील फोन हाच आमचा आधार. अबुल भैय्या कायम बाहेर आणि भाभी कायम दुकानात. त्यांच्या दुकानातील साहित्य उधारी घेऊन आम्ही जमेल तेंव्हा पैसे द्यायचो. कधी कुणाला फोन करायचा झाला तरी तीही उधारी सामानाच्या उधारी यादीत समाविष्ट व्हायची. रात्री अपरात्री कधीही फोन आला तरी हाक मारायला हे भैय्या भाभी कधीच त्रास वाटून घ्यायचे नाहीत. त्यादिवशीही तसेच झाले. 2004 चा जानेवारी महिना होता आणि तारीख होती 15. अचानक भाभीचा आवाज आला. अरे परसाद ...